२०२० मध्ये स्थापन झालेल्या ‘स्वादबंध’ या ब्रँडची कहाणी आहे प्रेम, परंपरा आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांची. अमृता केदार जोशी यांनी ‘उर्वी कलेक्शन व किचन’ या कंपनीअंतर्गत ‘स्वादबंध’ची सुरुवात केली, ज्याचा उद्देश आहे भारतीय संस्कृतीतील पारंपरिक स्वादांना आधुनिक जीवनशैलीशी जोडणे.
‘स्वादबंध’ म्हणजे फक्त खाद्यपदार्थ नव्हे, तर भावनांचा आणि आठवणींचा बंध जो प्रत्येक चवीतून हृदयापर्यंत पोहोचतो. ‘स्वादबंध’ म्हणजे स्वादाचा बंध! ‘स्वादबंध’चा विश्वास आहे की उत्तम, सात्विक आणि पौष्टिक आहार हा माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात, विशेषतः नोकरदार आणि तरुण पिढीला घरगुती, आरोग्यदायी अन्न बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. प्रक्रिया केलेले अन्न, डब्यातील पदार्थ किंवा रस्त्यावरील जंक फूड यावर अवलंबून राहावे लागते. ‘स्वादबंध’ याच समस्येचे निराकरण करते. ते तुम्हाला १०० टक्के घरगुती, पारंपरिक आणि मायेच्या स्पर्शाने बनवलेले पदार्थ देतो, जे तुम्हाला तुमच्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण करून देतात.
‘स्वादबंध’मध्ये तुम्हाला ५० हून अधिक प्रकारचे पौष्टिक लाडू मिळतील साजूक तुपात बनवलेले, उच्च प्रतीच्या आणि नैसर्गिक सामग्रीपासून तयार केलेले. याशिवाय ते दिवाळी फराळासाठी प्रसिद्ध आहोत – अनारसे, करंज्या, मुग चकली, भाजणी चकली, चिवडा आणि बरेच काही!
प्रत्येक पदार्थ ऑर्डरनुसार ताजा बनवला जातो, ज्यामुळे त्यातील चव आणि पौष्टिकता अबाधित राहते. ‘स्वादबंध’ कृत्रिम रंग, चवी किंवा प्रिझर्व्हेटिव्हजचा वापर करत नाही, कारण आम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी आहे.
‘स्वादबंध’ची वचनबद्धता
गुणवत्ता : ‘स्वादबंध’ केवळ स्वच्छ, नैसर्गिक आणि उच्च प्रतीच्या सामग्रीचा वापर करतो.
परंपरा : प्रत्येक पदार्थात भारतीय संस्कृती आणि मायेचा स्पर्श आहे.
सुलभता : भारतात आणि भारताबाहेर माफक दरात आमचे पदार्थ पोहोचवतो.
सामाजिक योगदान : ‘स्वादबंध’ अन्नदान उपक्रमांना समर्थन देते. आम्ही अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बोर्डिंग स्कूल आणि मंदिरांना अन्नपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपतो, कारण त्यांना विश्वास आहे की अन्नदानामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळतो.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीअमृता जोशी यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वादबंध’ची हा फक्त एक ब्रँड नाही, तर आनंदाच्या छोट्या-छोट्या पेट्यांचा प्रवास आहे. प्रत्येक लाडू, प्रत्येक करंजी किंवा चकली बनवताना आम्ही तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतो. ‘स्वादबंध’चे पदार्थ केवळ पोटाची भूक भागवत नाहीत, तर तुमच्या मनाला समाधान देतात आणि तुम्हाला तुमच्या घरच्या आठवणींशी जोडतात.
जर तुम्ही खर्या, पारंपरिक आणि आरोग्यदायी मिठाई आणि फराळाच्या शोधात असाल, तर ‘स्वादबंध’ हा तुमचा अंतिम पर्याय आहे. ते तुम्हाला फक्त खाद्यपदार्थ देत नाही, तर एक अनुभव देतो – मायेचा, प्रेमाचा आणि स्वादाचा! ‘स्वादबंध’च्या प्रत्येक पदार्थातून तुम्हाला घरच्या जेवणाची उब आणि परंपरेची चव मिळेल.
कंपनीचे नाव : उर्वी कलेक्शन व किचन
कंपनीचे मालक : अमृता केदार जोशी
Contact: 77740 10132 / 79778 28760
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

