व्यक्तिमत्त्व विकास

मनाचे दोरखंड तोडा…

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


एकदा एक माणूस एका हत्तीच्या बाजूने जाता जाता अचानक थांबला. अवाक होऊन तो समोरचे दृष्य पाहत होता. त्या एवढ्या बलाढ्या हत्तीच्या पायात साखळदंड नव्हते तर केवळ एक छोटी दोरी त्याच्या पुढच्या पायाला बांधली होती. खरं तरं तो महाकाय प्राणी अशा अवस्थेत कोणतीही नासधूस करू शकला असता, पण तो शांत उभा होता.

नेमकी हीच गोष्ट त्या पाहणार्‍याला खटकली होती आणि तो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. त्या हत्तीचा माहुत तिथेच जवळ होता. तो माणूस त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं, “हा महाकाय प्राणी केवळ एका पायात एवढीशी दोरी बांधलेली असूनही इतका शांत कसा?”

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

माहुताने उत्तर दिलं, “जेव्हा हा हत्ती लहान होता, तेव्हा त्याच्या पायात हा दोर बांधत असू. त्यावेळी त्याला काबूत ठेवण्यसाठी तो दोर पुरेसा होता. तेव्हा त्याने हा तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला तेव्हा ते शक्य नव्हतं. पुढे जसंजसा तो मोठा होत गेला तसं त्याच्या मनात हे रूजलं की आपण हा दोरखंड तोडू शकतच नाही. त्यामुळे आता तो ते तोडण्याचा प्रयत्नच करीत नाही.

ऐकणार्‍याला हे आश्चर्य वाटलं. एवढा अवाढव्य प्राणी कधीही तो दोरखंड दूर करून स्वत:ला स्वतंत्र करू शकला असता, परंतु त्याच्या मनात हे रूजलं की हे बंधन आपण तोडू शकत नाही, त्यामुळे तो आजही जिथल्या तिथेच खिळला आहे.

अगदी या हत्तीप्रमाणेच आपणसुद्धा आपल्या आयुष्यात आपल्याला काही जमणार नाही, अशी समजूत बाळगून जगत असतो. एकदा अपयश आलं की पुन्हा जमणारच नाही, असं मनाशी ठाम करून घेतो.

निष्कर्ष : अपयश आपल्याला खूप काही शिकवते, पण त्या अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करत राहिले की एक ना एक दिवस यश नक्की मिळते.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!