आपल्या प्रगतीसाठी दुसरं कोणी, मग ते शासन, प्रशासन, राजकारणी, समाजकारणी इत्यादी कोणीही काम करेल याची वाट न पाहत बसता, आपल्यालाच आपल्यासाठी आपला वेळ, शक्ती, बुद्धी आणि सर्वस्व गुंतवले पाहिजे. किती काळ अंथरूण पाहूनच पाय पसरणार? कधी तरी अंथरूण मोठं करण्याचा विचार केला पाहिजेच ना? आणि हा नुसता विचार करून चालणार नाही, तर त्यासाठी प्रयत्न आणि मेहनतही करावी लागणार आहे.
आपल्या घरात सुबत्ता यायची असेल, तर आपल्यालाच आपली कार्यप्रवणता वाढवली पाहिजे. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, ही वृत्ती सोडून मराठी माणसाने अधिकाधिक सुबत्ता मिळवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे; म्हणजेच नोकरी वा कसाबसा चाललेला व्यवसाय-व्यापार याच उत्पन्नाच्या एकाच मार्गावर अवलंबून न राहता त्याच्या जोडीला काही तरी जोडधंदा केला पाहिजे.
यातूनच आपल्याला आपली स्वप्नं पूर्ण करता येणार आहेत, संपत्ती निर्माण करता येणार आहे, गुंतवणूक करता येणार आहे. यातूनच संपूर्ण महाराष्ट्र आणि देश खर्या अर्थाने प्रगत होईल.
एक सामान्य नोकरदार आणि उद्योजक यांच्यात मूलभूत फरक हाच आहे की, नोकरदार तयार केलेल्या यंत्रणेनुसार सांगितले जाईल तितकेच काम करतो आणि उद्योजक हा स्वत:ची यंत्रणा निर्माण करतो.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)उद्योजकतेची सुरुवात ही स्वावलंबनातून होते. तुम्हीही उद्योजक होण्याचा विचार करत असाल, तर नोकरदारीतील परावलंबी मानसिकता सोडून कार्यप्रवण व्हा!
– शैलेश राजपूत
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.