२० प्रिंट मासिकांचा सेट + आजीव डिजिटल वर्गणी मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
अधिक माहितीसाठी : shop.udyojak.org/product/010/
उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ॥धृ.॥
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ॥१॥
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली ॥२॥
उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली ॥३॥
धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ॥४॥
(१९८० साली प्रदर्शित झालेल्या सिंहासन या गाजलेल्या चित्रपटातील हे गाणे. या गीताचे गीतकार होते सुरेश भट. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याला संगीत दिले तर आशा भोसले यांनी हे गीत गायले.)
हे गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia