मोठ्या उत्पादकांना कच्चा व तयार माल पुरवणे

टाटा, बिर्ला, बजाज, किर्लोस्कर यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या नावाने खपणारा सर्व माल स्वत:च बनवत नाहीत. अर्थशास्त्रात ऑप्टिमम फर्म नावाची एक संकल्पना आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, कंपनीचे सर्व घटक अत्युच्च स्थितीला जेव्हा जातात तेव्हा ती कंपनी ऑप्टिमम फर्म या स्थितीला पोचली असं मानता येईल.

यानंतर समजा त्या कंपनीच्या मालाला पंचवीस टक्के अधिक मागणी आली, तर त्या कंपनीच्या नफ्याच्या टक्केवारीत वाढ होण्याऐवजी कमतरता निर्माण होते. अशा वेळी ती कंपनी दुसर्‍या उत्पादकाकडून माल तयार करून घेऊन तो आपल्या नावावर खपवते व बाजारातील मागणी पुरी करते.

ह्याकरिता तुम्हाला त्या कंपनीला लागणारा माल, त्याच्या निर्मितीची किंमत, त्याचा दर्जा वगैरेंची चांगली माहिती पाहिजे. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. तेव्हा सुरुवातीला तुम्ही अपना बाजार, बेडेकर, कुबल यांना मसाले, लोणची, पापड इत्यादी पुरवा. तुम्ही त्यांना कमी किमतीत दर्जेदार मालाचा नियमित पुरवठा केलात तर ते जरूर घेतील.

– हरीश परळकर

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?