विकास वाटेवर नेणारे ‘पर्यटन’

‘पर्यटन’ हा आज प्रत्येकाच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भागच झाला आहे. देशाच्या आर्थिक विकासात पर्यटन या क्षेत्राचा खूप मोठा वाटा असतो. पर्यटनात त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टींचा विकास एकत्रित होत असतो. देशांतर्गत पर्यटनाच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा आहे. पर्यटन म्हणताच पारंपरिक पर्यटन आपल्या डोळ्यासमोर येते.

मात्र भारताचे जे जगातील वेगळेपण आहे, त्याचा पर्यटकीयदृष्ट्या विकास केला तर देशाच्या अर्थकारणात पर्यटनाचा वाटा आणखी कैक पटींनी वाढू शकतो. अनेक देशी-विदेशी पर्यटकांसाठी केवळ थंड हवेची ठिकाणे आणि समुद्रकिनारे यांचाच जर पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करत राहिलो तर या क्षेत्राचा म्हणावा तसा विकास कधीच होणे शक्य नाही. त्यामुळे पारंपरिक पर्यटन क्षेत्रासोबत विकासवाटेने जाणार्‍या नव्या पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची आज आपल्या देशाला गरज आहे.

Source: hachikotourism.in

याचे ‘कृषी पर्यटन’ हे उत्तम उदाहरण आहे. आपला देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आजही शेती हाच या देशात मुख्य व्यवसाय आहे. पारंपरिक शेतीला पर्यटनाची जोड देऊन कृषी पर्यटन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल घडवून आणण्यात यशस्वी ठरू शकतो.

कृषी पर्यटन ही संकल्पना मूळची परदेशी असली तरी आज आपल्याकडे ती खूप चांगल्या प्रकारे आणि वेगाने जोर धरत आहे.

भविष्यात भारत हा कृषी पर्यटनासाठीचा देश म्हणून जागतिक क्रमवारीत अव्वल ठरू शकेल. भारतात ‘धार्मिक पर्यटना’ला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. भारतातील विविध धार्मिक स्थळे आणि त्यांचे माहात्म्य, त्यांचा इतिहास आणि लोकांची श्रद्धा याचा विचार करता, प्रत्येकाला या ऐतिहासिक स्थळांची माहिती करून घेण्याची इच्छा असतेच.

नियोजन आणि अभ्यास यांची सांगड करून या पर्यटनालाही आपण चालना देऊ शकतो. अशा पद्धतीचेच आहे, ‘सामाजिक पर्यटन’. देशभरात विविध ठिकाणी विविध पद्धतींच्या सामाजिक संस्था आणि उपक्रम कार्यरत असतात. अशा संस्थांची, ठिकाणांची माहिती करून घेण्याची मनीषा प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे दडलेली असतेच.

यासारख्या संकल्पनांना मुख्य प्रवाहासोबत रुजवून पर्यटन म्हणून विकसित केले गेले तर सामाजिक बांधीलकी आणि समाजऋण याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईलच, पण एक सक्षम व्यवसायनिर्मितीही होतेच. वैद्यकीय, साहसी, दुर्ग पर्यटन, दुर्गम पर्यटन अशा नवनवीन संकल्पना ही अधोरेखित होतात. हीसुद्धा एक प्रकारे प्रगतीची नांदीच आहे.

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?