निम्म्याहून अधिक स्टार्टअप, नवीन तरुणांनी सुरुवात केलेले उद्योग बंद पडण्यामागे ग्राहकांचं योगदान आधिक असते, कारण आपल्याकडे “माल आधी – पैसे नंतर” आणि वस्तू मागताना एवढी किंमत पाडायची की बिचार्या त्या उद्योजकाला कशाला हा धंदा चालू केला असं वाटू लागतं.
एकतर उद्योजक नवा असतो व अशा सर्व गोष्टींचा अनुभव नसल्यामुळे त्याचे पूर्णपणे खच्चीकरण होते. त्यामुळे धंदा बंद पडतो – नुकसानीत जातो. यामुळे त्याचा आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. भारतीय लोकांनी बाहेरच्या देशाची फक्त खाद्य आणि कपड्यांची संस्कृती अवलंबली, पण नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवीन गोष्टींना चालना देणे स्वीकारले नाही.
एक आणखी गोष्ट नजरेत आली ती म्हणजे आपल्याकडे ९५ टक्के दिखावू गोष्टींना किंमत दिली जाते, क्वॉलिटी मालाची प्रत कितीही चांगली असो, त्याची किंमतसुद्धा आपल्याला दिखावू गोष्टींच्या किमती इतकीच द्यायची असते.
– दर्शन गणे
८४८२८२९९८८