अक्षय्यतृतीया, उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस

अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस. असं मानलं जातं की या दिवशी ज्या ज्या गोष्टींची सुरुवात केली जाते, त्यांचा क्षय होत नाही. म्हणजे त्या गोष्टी बंद पडत नाही.

व्यापारउदीम सुरू करण्यासाठी, नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन युनिट, नवी फॅक्टरी, नवे प्रॉडक्ट, नवी सेवा इत्यादी सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ म्हणजे चांगला मानला गेला आहे. त्यामुळे उद्योजक या दिवशी नवे संकल्प करून अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करू शकतात.

अक्षय्यतृतीयेचं दुसरं महत्त्व म्हणजे हा दान करण्याचा दिवस मानला जातो. तुमच्याकडे ज्या गोष्टी अक्षय्य राहाव्यात, वाढत्या राहाव्यात असं वाटतं असेल त्यांचं दान या दिवशी केलं जातं. समाजात दानकार्यात उद्योजक, व्यापारी यांचा नेहमी मोलाचा वाटा राहिला आहे. सर्वाधिक दान हीच मंडळी करतात.

दानाचं महत्त्व सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलं आहे की, दान केल्याने तुमच्याकडील गोष्टी कमी होत नाहीत तर अनेक अज्ञात हातांनी तुमच्याकडे त्याचं गोष्टी boomrang होऊन तुमच्याकडे अनेकपटींनी परत येत असतात. त्यामुळे आपणही आपल्या स्तरावर यथाशक्ती दान आजच्या दिवशी करावं.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

Author

  • हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?