स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस. असं मानलं जातं की या दिवशी ज्या ज्या गोष्टींची सुरुवात केली जाते, त्यांचा क्षय होत नाही. म्हणजे त्या गोष्टी बंद पडत नाही.
व्यापारउदीम सुरू करण्यासाठी, नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन युनिट, नवी फॅक्टरी, नवे प्रॉडक्ट, नवी सेवा इत्यादी सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ म्हणजे चांगला मानला गेला आहे. त्यामुळे उद्योजक या दिवशी नवे संकल्प करून अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करू शकतात.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
अक्षय्यतृतीयेचं दुसरं महत्त्व म्हणजे हा दान करण्याचा दिवस मानला जातो. तुमच्याकडे ज्या गोष्टी अक्षय्य राहाव्यात, वाढत्या राहाव्यात असं वाटतं असेल त्यांचं दान या दिवशी केलं जातं. समाजात दानकार्यात उद्योजक, व्यापारी यांचा नेहमी मोलाचा वाटा राहिला आहे. सर्वाधिक दान हीच मंडळी करतात.
दानाचं महत्त्व सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलं आहे की, दान केल्याने तुमच्याकडील गोष्टी कमी होत नाहीत तर अनेक अज्ञात हातांनी तुमच्याकडे त्याचं गोष्टी boomrang होऊन तुमच्याकडे अनेकपटींनी परत येत असतात. त्यामुळे आपणही आपल्या स्तरावर यथाशक्ती दान आजच्या दिवशी करावं.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.